स्वामी विवेकानंद यांची माहिती मराठी मध्ये – Swami Vivekananda Information in Marathi

Swami Vivekananda Information in Marathi : समाज सेवक स्वामी विवेकानंद यांची माहिती मराठीत , वाचा पूर्ण स्वामी विवेकानंद यांचे सामाजिक कार्य , विचार, मृत्यू, व बरच काही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Swami Vivekananda Information in Marathi

  • जन्म : १२ जानेवारी १८63
  • मृत्यू : ४ जुलै १९०२
  • पूर्ण नाव : नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त.
  • जन्मस्थान: कलकत्ता (पं. बंगाल).
  • वडील :विश्वनाथ दत्त.
  • आई : भुवनेश्वरी देवी.
  • शिक्षण: इ. स. १८८४ मध्ये बी.ए. परीक्षा उत्तीर्ण.
  • विवाह: अविवाहित

स्वामी विवेकानंद कार्य

कॉलेजात शिक्षण घेत असताना ते ब्राह्मो समाजाकडे आकृष्ट झाले होते. ब्राह्यो समाजाच्या प्रभावामुळे ते मूर्तिपूजा व बहुदेवतावाद यांच्या विरोधी होते.

परंतु पुढे इ. स. १८८२ मध्ये त्यांची रामकृष्ण परमहंस यांच्याशी भेट झाली. ही घटना विवेकानंद यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. योगसाधनेच्या मार्गाने मोक्षप्राप्ती करून घेता येते, असा रामकृष्ण परमहंसांचा विश्वास होता. त्यांच्या या विचारांचा विवेकानंद यांच्यावर मोठाच प्रभाव पडला आणि ते रामकृष्णांचे पट्टशिष्य बनले.

इ. स. १८८६ मध्ये रामकृष्ण परमहंस यांचे देहावसान झाले.

इ.स. १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो या शहरी जागतिक सर्वधर्मपरिषद भरली होती या परिपदेला स्वामी विवेकानंदानी उपस्थित राहून हिंदू धर्माची बाजू अतिशय प्रभावीपणे मांडली. आपल्या भाषनाही सुरुवात ‘प्रिय बंधु-भगनींनो अशी करून त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत हिंदू धर्माची श्रेष्ठता व उदानता पटवून दिली.

स्वामी विवेकानंदांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे आणि त्याच्या विद्वत्तेमुळे अमेरिकेतील अनेक लोक त्यांच्या भजनी लागले. त्यांच्या चाहत्यांनी अमेरिकेत ठिकठिकाणी त्यांची व्याख्याने घडवून आणली. विवेकानंदांनी अमेरिकेत दोन वर्षे वास्तव्य केले. या वास्तव्याच्या काळात त्यांनी हिंदू धर्माचा, विश्वबंधुत्वाचा महान संदेश तेथील लोकांपर्यंत पोहोचविला.

5 त्यानंतर स्वामी विवेकानंद इंग्लंडला गेले. तेथील कु. मागर्यरेट नोबेल या त्यांच्या शिश्या बनल्या. पुढे त्या भगिनी निवेदिता म्हणून प्रसिद्ध झाल्या.

इ. स. १८९७ मध्ये त्यांनी ‘रामकृष्ण मिशन’ ची स्थापना केली. त्यासोबतच जगात ठिकठिकाणी रामकृष्ण मिशनच्या शाखा स्थापन केल्या. जगातील सर्वच धर्म सत्य असून ते एकाच ध्येयाप्रत जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, अशी रामकृष्ण मिशनची शिकवण होती.

रामकृष्ण मिशनने धार्मिक सुधारणा बरोबर सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी विशेष प्रयल केले. याशिवाय मिशनच्या वतीने ठिकठिकाणी अनाथाश्रम, रूग्णालये, वसतिगृहे यांची स्थापना केली.

‘कर्मकांड, अंधश्रद्धा व आत्यंतिक ग्रंथप्रामाण्य सोडा, विवेकबुद्धीने धर्माचा अभ्यास करा, मानवाची सेवा हाच खरा धर्म आह’ अशी शिकवण त्यांनी भारतीयांना दिली. त्यांनी जातिव्यवस्थेवर हल्ला चढविला. त्यांनी मानवतावाद व विश्वबंधुत्व या तत्वांचा पुरस्कार केला. हिंदू धर्म व संस्कृती यांचे महत्त्व विवेकानंदांनी पाश्चात्त्व जगाला पटवून दिले.

स्वामी विवेकानंद विशेषता

स्वामी विवेकानंदांचा १२ जानेवारी हा जन्मदिन ‘युवकदिन’ म्हणून साजरा केला जातो.

स्वामी विवेकानंद शिकवण

  • त्यांच्या मते सर्व प्राणिमात्र शिवाचे अंश आहेत, त्यामुळेच ‘शिवभावे जीवसेवा’ हे रामकृष्ण यांचे वचन त्यांनी शिरोधार्य मानले.
  • प्रत्येक जीव हा मूळ रूपातच ईश्वरी/दैवी आहे.
  • अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे.
  • कर्म किंवा पूजा किंवा मानसिक नियंत्रण किंवा तत्त्वज्ञान यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा उपयोग करून मुक्ति मिळवली पाहिजे.
  • उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.
  • ‘दरिद्री नारायण’ हा शब्द विवेकानंदानी जगाला दिला.

स्वामी विवेकानंद भारतभ्रमण

आम्ही तुम्हाला सांगितो इच्छितो की वयाच्या 25 व्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी गेरु वस्त्र परिधान केले आणि त्यानंतर ते संपूर्ण भारत पायी निघाले. त्यांच्या पैदाल यात्रे  दरम्यान त्यांनी अयोध्या, वाराणसी, आग्रा, वृंदावन, अलवर यासह अनेक ठिकाणी भेटी दिल्या.

या प्रवासादरम्यान ते राजांच्या राजवाड्यात आणि गरीब लोकांच्या झोपडीतही राहिले. त्यांच्या यात्रे  दरम्यान, त्यांना विविध क्षेत्र आणि तेथील लोक याबद्दल माहिती मिळाली. यावेळी त्यांना जातीभेद यासारख्या दुर्दशांबद्दलही माहिती मिळाली जे त्यांनी पुढे जाऊन  मिटवण्याचा प्रयत्न केला.

23 डिसेंबर 1892 रोजी विवेकानंद कन्याकुमारीला पोहोचले आणि तेथे ते 3 दिवस गंभीर समाधीत राहिले. येथून परत आल्यावर त्यांनी राजस्थानमधील अबू रोड येथे आपले गुरुभाई स्वामी ब्राह्मानंद आणि स्वामी तुर्यानंद यांची भेट घेतली.

ज्यामध्ये त्यांनी आपल्या भारत भेटीदरम्यान त्यांनी अनुभवलेले दारिद्र्य आणि दुःख यांची त्यांना माहिती दिली यानंतर या सर्वांपासून मुक्तीसाठी त्यांनी अमेरिकेत जाण्याचे ठरविले.

विवेकानंदांच्या अमेरिका भेटीनंतर त्यांच्या भारताविषीयी विचारामध्ये एक मोठा बदल घडला.

1893 मध्ये विवेकानंद शिकागो येथे दाखल झाले आणि तेथे त्यांनी जागतिक धर्म परिषदेत भाग घेतला. यावेळी, अनेक धर्मगुरूंनी त्यांचे पुस्तक एकाच ठिकाणी ठेवले, तर भारताच्या धर्माचे वर्णन करण्यासाठी श्री मद  भगवद्गीतां  ठेवली  होती , ज्याची खूप थट्टा केली गेली होती, परंतु जेव्हा विवेकानंदांनी अध्यात्म आणि ज्ञानाने आपले भाषण सुरू केले, तेव्हा सर्व सभागृहाने त्यांचे कौतुक केले आणि पूर्ण सभागृह टाळ्यांनीं गडगडला.

स्वामी विवेकानंदांच्या  भाषणात वैदिक तत्त्वज्ञानाचे ज्ञान होते तसेच जगात शांतता जगण्याचा संदेशही होता, भाषणात स्वामीजींनी कट्टरतावाद आणि जातीयवादावर हल्ला केला.

यावेळी त्यांनी भारताची एक नवीन प्रतिमा पूर्ण जगाला प्रदान केली आणि यासह ते सुद्धा खूप लोकप्रिय झाले.

स्वामी विवेकानंद मृत्यू

1901 मध्ये त्यांनी बोधगया व वाराणसीची यात्रा केली. यावेळी त्यांची तब्येत सातत्याने खालावत होती. त्यांना दमा आणि मधुमेह सारख्या आजारांनी वेढले होते.

स्वामी विवेकानंद यांचे वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी 4 जुलै 1902 रोजी निधन झाले. त्यांच्या शिष्याप्रमाणे त्यांनी महा-समाधी घेतली होती. 40 वर्षापेक्षा जास्त काळ जगणार नाही असा त्यांच्या भविष्यवाणीला त्यांनी खरे केले. अश्या या  महान माणसाचा अंत्यसंस्कार गंगा नदीच्या काठावर करण्यात आला.

तुम्ही वाचली आहे Swami Vivekananda Information in Marathi आवडल्यास कमेंट करून कळवा .

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा